पोवाडा: शिवाजी महाराज यांचे शेती धोरण

Powada shivaji maharaj sheti dhoran

वतनदार ते रयतेवरती करीत होते मनमानी
फौजफाटा, गडकोट राखती, शेतसारा वर लादुनी....

औतकाठी अन बी-बियाणे, रयतेसाठी पुरविली
दुष्काळाच्या संकटकाळी, करमाफी हो राबवली

वतनदाराचे सैन्य उभ्या पिकाला तुडवी
बांधाबांधानं सैन्य चालं ही रीत नवी घडवी
राजा रं जी जी, शिवबा रं जी जी
राजा रं जी जी, हे हे हे हे हे हे
स्वराज्याकामी गरज तुम्हां जर लाकूडफाट्याची
घ्या राजी करुन अन किंमत देऊन, आज्ञा शिवबाची
राजा रं जी जी, शिवबा रं जी जी
राजा रं जी जी, हे हे हे हे हे हे
पोटच्या पोटापरी घेतली काळजी पिकांची ( भाजी ती काय? )
देठालाही शिवू नका ही आज्ञा शिवबाची..
राजा रं जी जी, शिवबा रं जी जी
राजा रं जी जी, हे हे हे हे हे हे

करु पहिलं नमन जोतिबाला….हा हा हा......
करु पहिलं नमन जोतिबाला, क्रांतीसूर्याला, त्यांच्या कार्याला
शिवबाच्या शोधलं समाधीला
शिवबावं पवाडा त्यांनी रचिला
कुळवाडीभूषण म्हटलं शिवाजीला
सुरू केलं हो शिवजयंतीला जी जी जी जी जी जी...
(जयघोष) महात्मा फुले शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणतात....
शेतकर्यां चा राजा पहिला, ऐषोरामाला नाही भुलला
थांबवला वतनदारांचा मार, प्रजेचं मिळवलं प्रेम अपार - आ...आलाप
मंदीर मशिदीला करी दान तो, घेई आशीर्वाद संतांचा तो

रयतेचं सुख त्याचं सुख होतं, बनवत होता कायदा नवा
मावळे गडी सोबतीला, शिपाई केले सर्व जातीला - आ...आलाप
युक्तीने वाचवी जिवाला तो, भिईना कधी संकटाला तो

शिवाजी राजा कुळभूषण...
जराही मिळे नाही दूषण...
असे म्हणे जोतिबा फुले शब्द ना मिळे.....जी..र...हा..जी..जी...जी...जी

Read more

एआयचे वस्तूपूजकत्व

एआयचे वस्तूपूजकत्व

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle
जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

मुख्य न्यायाधीशांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीपासून सुरू झालेली कॉकरोच जनता पक्षाची व्यंग्यात्मक चळवळ काही दिवसांतच कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली. या घडामोडींनी तरुणांमधील असंतोष, प्रसारमाध्यम स्वातंत्र्यावरील चिंता आणि भारतातील बदलत्या डिजिटल राजकारणाकडे लक्ष वेधले.

By Shubham Halle